बेवडा पिऊन किडन्या गेल्या, छगन भुजबळ यांची जरांगें पाटलांवर ओकली गरळ.

कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद आणखी पेटणार आहे अशी चिन्ह दिसून येत आहेत. छगन भुजबळ यांनी काल भिवंडी येथील सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आणखी पेटणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. भिवंडीच्या ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत तिखट शब्दात जरांगें पाटलांवर टीका केली आहे. तर जरांगेंसमोर सरकार अजून किती झुकणार असा थेट सवाल भुजबळांनी शिंदे सरकारला केला. त्यामुळे आता हा वाद शमण्याऐवजी आणखी पेटणार की काय अशी चर्चा सुरू झाली.

जे ओबीसींविरोधात बोलतायत, त्यांचा कार्यक्रम येणा-या निवडणुकीत करा, असं भुजबळांनी म्हटलंय. भिवंडीमधल्या ओबीसी मेळाव्यातून भुजबळांनी हे विधान केले आहे.





पुढे बोलताना भुजबळ म्हणाले कि,ओबीसी लढाई मी स्वतःसाठी लढत नाही किंवा माझ्या घरच्या साठी लढत नाही. माझ्या समाजाला कुठे आता आरक्षण मिळायला लागले आहे. आमचा मराठा समाजाला किंवा त्यांना मिळणाऱ्या आरक्षणाला विरोध नाही आमचा विरोध झुंडशाहिला आहे. आमचे घर जाळले. जाळपोळ करणाऱ्याला विरोध आहे. मराठा समाजाला आरक्षन द्या आमचा विरोध नाही. आगोदरचे कुणबी दाखले आम्हाला मान्य आहेत. काही कुणबी म्हूणन फिरतात आणि खोटे दाखले दिले जातात. आगोदर आमच आरक्षण भरा
नंतर दुसऱ्यांना द्या. खोटे कुणबी घेऊन आलेत. जरांगे आमची लायकी काढतात येवल्याचा
एडपट बोलतात. आगोदर मरकट आहे. बेवडा पिऊन किडन्या गेल्या, आमची लायकी काढतोय आमची मुलं हुशार आहेत, असं म्हणत छगन भुजबळ यांची जरांगेंवर जहरी टीका केलेय.

छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव घ्यायचे आणि आमच्या वर हल्ला करायचे. आम्ही सहा कोटी आहेत असे म्हणातत. कुठून आणले तुम्ही हे सहा कोटी. आम्ही 54 टक्के आहोत. साडेसात कोटी ओबीसी आहे. दादागिरी एवढी वाढली आहे की गाव बंदी केली जाते. आम्हला गाव बंदी आणि रोहित पवार यांचं स्वागत. जालना मध्ये मिटिंग असेल तर सुट्टी दिली जाते. ही लोकशाही नाही गुंडगिरी आहे. आरक्षण मिळाला तर कार्यक्रम करू काय दादागिरी आहे.

तुम्ही आम्हला मारण्याची धमकी देता. पोलिसांना मारहाण करतो आम्हाला धमकी देतो. सर्वांनी एकत्र या पक्ष सोडा. महात्मा गांधी यांच्या उपोषण ठिकाणी इंग्रज सरकारचे अधिकारी जायचे. तसे आमचे मंत्री त्यांच्या पायाशी जातात पाया पडतात. हे थांबवायला पाहिजे. जे ओबीसी विरोधात बोलतात त्याचा येणाऱ्या इलेक्शन मध्ये दाखवून द्या. माझी वाट पाहू नका. साखळी उपोषण करा, जागो जागी मिटींगी घ्या, कँडल मार्च काढा असे आवाहन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांना केले.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने