मराठा आरक्षणासंदर्भात मोठा दावा. मराठा अन् कुणबी एकच, ब्रिटीशकालीन पुराव्यावरुन कोणी केला दावा

मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी या गावांमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते परंतु या आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज झाला आणि हे आंदोलन महाराष्ट्रभर चर्चेत आले, लाठीचार्जमध्ये महिला वृद्ध जखमी झाल्यामुळे व त्या घटनेचे फोटो महाराष्ट्रभर वायरस झाल्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरुण अस्वस्थ झाला आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा अचानक महाराष्ट्रभर चर्चेत आला. यासंदर्भात सरकारने तात्काळ ॲक्शन प्लॅन करून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात बाजू मांडण्यासाठी दोन निवृत्त न्यायमूर्तींची समिती तयार केली. 


मनोज जरांगे पाटील यांचे दुसऱ्या वेळेचे उपोषण संपल्यानंतर मुख्यमंत्री आली त्यांनी तात्काळ महाराष्ट्रभरातील जिल्हाधिकाऱ्यांची vc द्वारे बैठक बोलावली व त्यामध्ये महाराष्ट्रभरातील मराठा व कुणबी दाखले यासंदर्भातील पुरावे गोळा करण्यासंदर्भात सांगितले व यासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात तयार करण्यात आलेली
शिंदे समिती मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे शोधत आहे. या समितीला राज्यभरात हजारो नोंदी मिळाल्या आहेत. 
आता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मोठा दावा केला आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत, यासंदर्भात ब्रिटीशकालीन पुरावे आहेत, असे त्यांनी पञकारांशी बोलताना स्पष्ट केले.

काय म्हणतात प्रवीण गायकवाड

देशात इंग्रजांच्या काळापासून मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या नोंदी आहेत. त्या काळात आरक्षण नव्हते. परंतु आता आरक्षण आहे. त्यामुळे मराठा समाजास कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. परंतु हे आरक्षण ओबीसीमधून दिले जाऊ नये. देशात ओबीसींचे प्रमाण 52 टक्के आहे. परंतु ओबीसी समाजास केवळ 27 टक्के आरक्षण मिळत आहे. त्यामुळे त्यात मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही.

ओबीसीमधून आरक्षण देणे ही राजकीय अडचण

ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही. त्यामुळे ओबीसी समाजही नाराज होणार आहे. तसेच राज्यकर्त्यांची राजकीय अडचण निर्माण होणार आहे. सर्वच पक्षांना हा विषय अडचणीचा ठरणार आहे. मी मराठा आरक्षणाचा समर्थक आहे. मात्र आता मराठा तरुणांनी जिकडे नोकरी मिळेल तिकडे नोकरी केली पाहिजे. आरक्षणाची वाट पाहत बसू नये, असे प्रविण गायकवाड यांनी स्पष्ट केले.

लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांना सहानुभूती

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले होते. ते प्रथम उपोषणास बसले तेव्हा शासनाला हा विषय योग्य पद्धतीने हाताळता आला नाही. त्यावेळी लाठीचार्ज करण्यात आला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळाली आणि मराठा तरुण अवस्थ झाला, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने