विद्यार्थ्याचा शाळेत ताणामुळे हार्टअटॅकने मृत्यू; जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला ऐतिहासिक निर्णय.

विद्यार्थ्यांची शाळेच्या ताण-तणावातून सुटका होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. आपली मुलं शिकून मोठी व्हावी उच्चशिक्षित व्हावी असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. त्यासाठी ते मुलांना चांगलं उच्च दर्जाचे शिक्षण कसं मिळेल याचासाठी प्रयत्न करतात. एकविसाव्या शतकात स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना दिवसभराची शाळा, क्लासेल आणि राहिलेल्या वेळेत होमवर्क यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे मोठे मानसिक ताण सहन करावे लागते. या तणावातून सुटका होण्यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं एक
 ऐतिहासिक निर्णय घेतलाय. 
 

काय आहे निर्णय?

शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांची ( विशेषत: खासगी इंग्रजी शाळा) वेळ साडेपाच तासांपेक्षा जास्त नसावी, असा आदेश काढला आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत अतिरिक्त थांबवून त्यांच्याकडून अभ्यास घेतला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण वाढतो. त्यामुळे शाळेतील अध्यापनाचे काम हे साडेपाच तासांपेक्षा जास्त नसावं. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार हसत-खेळत पद्धतीनं शिकवावं, असं शिक्षण विभागानं स्पष्ट केले आहे. यामुळे साहजिक विद्यार्थी स्वतः मैदानी खेळ अथवा इतर गोष्टी ला आपला वेळ देतील. यासाठी पालकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 


विद्यार्थ्यांना ताण - तणाव कशामुळे? 
मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा विचारही शाळांनी करावा, आवश्यक व गरजेपुरते वहया पुस्तके शाळेत आणावी, सर्व विषयांसाठी एकच वही ठेवावी. गरज नसलेली पुस्तके शाळेतच ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. मुलांचे पाठीवरील दप्तराचे ओझं कमी करण्यासाठी शाळांनी सर्व उपाय करावेत, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलंय.


बीड शहरात काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांचा वर्गातच हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर जिल्हाभर खळबळ उडाली होती, जिल्ह्यातील शिक्षण तज्ज्ञ तसंच सामाजिक संघटनांनी अध्यापनाच्या वेळेत बदल करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर शिक्षण विभागानं हे आदेश दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने