महायुती मध्ये अजित पवार यांनी आमदारांना सोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना नेहमीच उधाण आलं आहे. अशातच माजी मंत्री, महायुतीतील घटक पक्ष असणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचं वाटोळं होईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
“शरद पवार भाजपाबरोबर गेले, तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचे मोठे वाटोळं होईल. पण, एकनाथ शिंदेंच्या कामात कोणी आडवं येऊ नये,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
Tags:
राजकीय