महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर 'उद्योग रत्न' पुरस्कार सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. या पहिल्या उद्योगरत्नाचे मानकरी म्हणून रतन टाटा यांचे नाव जाहीर देखील करण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्र शासनाचा पहिलाच पुरस्कार उद्योजक रतन टाटा यांना देण्यात येणार आहे.
उद्योगरत्न पुरस्काराचे स्वरुप असे असणार.?
उद्योग रत्न पुरस्काराचे स्वरूप हे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या दर्जाच्या स्वरूपाचे असणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार आहे. महाराष्ट्र भुषण पुरस्कारांची सुरूवात 1997 शिवसेना भाजपच्या युतीच्या काळामध्ये करण्यात आली.
Tags:
Human Marathi News